Type Here to Get Search Results !

सांगली: बरं झालं महात्मा गांधींना मारलं....: ‘यांचे’ वादग्रस्त वक्तव्य!



सांगली :महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.  स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणाऱ्या आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणाऱ्यांची राज्यात सत्ता आहे. बर झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते, असे वादग्रस्त विधान तुषार गांधी यांनी केले.



यावेळी  तुषार गांधी म्हणाले, बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते. सभोवताली अन्याय अत्याचार सुरू असताना आपण गप्प बसलो आहोत. लोकशाही जीवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकशाही नालायक होत चालली आहे, असे तुषार गांधी यांनी वक्तव्य केले आहे.



दरम्यान, सांगली मध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील 'प्रति सरकारचे योगदान' या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तुषार गांधी बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies