मुंबई : महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकारण पेटले आहे. दरम्यान,वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
वेदांता प्रोजेक्ट गुजरातला गेला याला तत्कालीन मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा थेट आरोप केसकर यांनी केला आहे. ते म्हणाले, “मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळही दिला नाही असा आरोप केसरकर यांनी केला. तसेच, महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी मागील सरकार किती सिरीयस होतं ? अस म्हणत दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.