रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे यांचा आज एक दिवसाचा दौरा आहे. निष्ठा यात्रेच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. ते रत्नागिरीत बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “केंद्रातील भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी कोरोना महामारीतही कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मविआ सरकार आज पडेल, उद्या पडेल, सकाळी पडेल, संध्याकाळी पडेल, असे अंदाज भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केले जात होते, आणि केंद्रातील भाजप सरकारनेही महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला आहे, तसेच, जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे कोरोनामुळे लोकांना प्राण गमवावे लागले, असे म्हणत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आरोप केला आहे.