Type Here to Get Search Results !

नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तरुणीने केले भयंकर कृत्य!

 


अकोला : अकोला शहरातील मध्य भागात दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षाप्रमाणे गुण न मिळाल्याने एका तरुणीने मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत आत्महत्या केली. रोहिणी विलास देशमुख असे मृतक तरुणीचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अकोल्यात नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने रोहिणी विलास देशमुख या तरुणीने शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत आत्महत्या केली. यापुर्वी रोहिणीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत ३५० च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला ४२० गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला ५६५ च्यावर गुणाची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण मिळाल्याने रोहिणी या तणावात होती.काल रात्री नियमितप्रमाणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. मात्र आज पहाटे ५ वाजता झोपेतून उठून बाहेर पडली नाही अन् या तणावातूनच तिने आत्महत्या केली. 



दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies