मुंबई : मोदी सरकारने 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माहितीनुसार, डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ही वाढ जुलै ते डिसेंबर 2022 पर्यंत वैध असेल. DA मध्ये 4 टक्के वाढ झाल्यानंतर 7व्या वेतन आयोगाच्या आधारे ज्यांचं बेसिक पगार 18,000 रुपये आहे त्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे. तर ज्याचा बेसिक पगार 25000 असेल त्यांचा पगार 1,000 रुपयांनी वाढेल. तर 50,000 बेसिक पगार मिळवणाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वाढ मिळेल. 1,00,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यानंतर 4,000 रुपयांचा लाभ मिळेल.
दरम्यान, ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित आहे.