जळगाव : भाजपच्या पंकजा मुंडे यांनी बीड येथे एका कार्यक्रमात मोदींनी ठरविले तरी मला हरवू शकत नाही; असे वक्तव्य केले होते. यावर एकनाथ खडसे यांनी आपले मत व्यक्त केले.
खडसे यांनी सांगितले, की स्व. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचा विस्तार तळागाळापर्यंत करण्याचा प्रयत्न केला. भाजप हा पक्ष बहुजन समाजापर्यंत नेण्याचे काम मुंडे साहेबांमुळेच झाले आहे. अजूनही पंकजा मुंडे यांची वाटचाल हीच आहे. त्यामुळे स्वाभाविक पंकजा मुंडे यांना असे वाटते की मी जनतेच्या मनामनामध्ये असेल. त्यामुळे त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही; असे त्यांना वाटले असेल.
पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य जनतेच्या मनात असेल; तर मोदीही हरवू शकणार नाहीत. हे वक्तव्य कोणत्या हेतूने केले अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मोदीजीचे नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतले हे मी सांगू शकत नाही. शिवाय मोदींना आव्हान देण्याची भाषा असेल तर ते दुर्दैवी आहे. पंकजा ह्या मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत तसा अर्थ घेऊ नाही; असे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केले.