Type Here to Get Search Results !

"सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण”!



पुणे: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता राज्य सरकारवर टीका केली आहे. 



शरद पवार म्हणाले, "सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. याशिवाय, सरकारने पुस्तकांवर जीएसटी लावला असंही शरद पवार म्हणाले आहेत. 



दरम्यान, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशन पुणे यांचे वतीने बालगंधर्व रंगमंदीर येथे विश्वस्त परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार होते. यामध्ये राज्यभरातील विश्वस्थ संस्था, प्रतिनिधी, वकील, धर्मदाय आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies