औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पैठणमधील जाहीर सभेत भाषण केले. सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री म्हणाले, राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळणे. मी एकदा शब्द दिला की माझं देखील ऐकत नाही. संदिपान भुमरे मला म्हणाले सत्तेतील घटकपक्षांकडून मुस्कटदाबी होत आहे. काय करायचं पुढच्या निवडणुकीत हातावर मोजण्याएवढे पण आमदार येणार नाहीत. राज्यातील जनतेला प्रॉब्लेम आहे. काहीतरी करायला हवं पण भुमरे असं काही करायला तयार होतील वाटलं नव्हते. मात्र, हा जबरदस्त धाडशी माणूस निघाला, संदिपान भुमरेलोकप्रिय नेते आणि जसे सगळे लोकं सांगतात त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळणारे निघाले असेही मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केले.
तसेच ते म्हणाले, “रोखठोकमधून एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे असल्याची टीका केली पण, त्याच साबणाच्या बुडबुड्याने तुमची मस्त धुलाई केली. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.