परभणी :“शहाजीबापू पाटील हे सहावेळेस पडले. जेव्हा ते शिवसेनेकडून उभे राहिले तेव्हा ते निवडून आले. मात्र त्याच शिवसेनेसोबत त्यांनी विश्वासघात केला. तुम्ही शहाजीबापू पाटील यांना उगच मोठे करून ठेवले आहे. काय त्याचे ते वाक्य त्यात कुठेतरी निष्ठा दिसते का असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच ते म्हणाले, तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलात. पाच वर्षांपैकी तीन वर्ष संपले आहेत आता फक्त उरले दोन वर्ष असे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी वक्तव्य केले आहे.
दरम्यान, भास्कर जाधव हे हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यापूर्वी त्यांनी आज परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. यावेळी ते बोलत होते.