नागपूर : “भाजपला दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसे महत्व देत नाही, आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत, असे वक्तव्य मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले.
तसेच, नागपुरातून राज ठाकरेंनी येत्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असेही त्यांनी भाष्य केले.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्या युतीची चर्चा आहे. यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्टीकरण दिले.