मुंबईः वेदांता प्रकरण, वर्सोवा सी-लिंक आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टिकेली उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्नांना उत्तर न देता, त्यांनी रोजगार, आणि राज्यातील औद्योगिकीकरणावरच वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्यातील होणारी गुंवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगारामधून सगळ्यात आधी भूमीपुत्रांना न्याय दिला पाहिजे, त्यांना आधी रोजगार मिळाला पाहिजे तसेच, 70 हजार युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे असेही त्यांनी सांगितले.
तसेच, नोकरभरती करायची असेल तर मुंबई, नागपूर, पुणे ही शहरं सोडून युवकांच्या मुलाखती चेन्नईत का घेतल्या जात आहेत, या प्रश्नावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.