पुणेः बारामतीत कुणीही येऊ द्या. त्यांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी काय करायचं, कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना चांगलंच माहिती आहे, असे किती आले आणि किती गेले. तुम्ही बारामतीची काळजी करू नका, असे वक्तव्य अजित पवारांनी केले.
अजित पवार म्हणाले, ‘ तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त कुणी बारामतीत काम करत असेल तर त्याचा विचार करता येईल. कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नसतात. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर हुरूप येतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.