नाशिक: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पटोले म्हणाले, वेदांतासारखे उद्योग ईडी सरकारने हे गुजरातला पाठवले, महाराष्ट्राची लुट करून गुजरातला पाठवतायत. २०१४ ते २०१९ ला जेव्हा स्वतः फडणवीस मुख्यमंत्री असताना आमचे पाणी गुजरातला पळवले आणि आता वेदांता देखील यांच्या काळातच गेला, असे वक्तव्य पाटोळे यांनी केले.
तसेच ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवली, राज्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मात्र, यांना देवाची पण भिती राहिली नाही. अनंत चतुर्दशीला घोषणा करतात पण अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.