मुंबई: गेल्या काही दिवसापासून वेदांता प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, वेदांता प्रकल्पासाठी वर्षभरापूर्वीपासून महाराष्ट्रासह गुजरातही प्रयत्न करत होते. ती काय वडापावची गाडी नाही सेनाभवनावरून उचलली आणि मातोश्रीला लावली, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
तसेच ते म्हणाले, 'येणाऱ्या काळात शिवसेनेतील ठाकरे गटाला जशास तसे नाही तर व्याजासह उत्तर दिले जाईल असेही प्रत्युत्तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.