सांगली : विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
“जयंत पाटलांच्या मनात प्रचंड भीती होती. काहीतरी बाहेर येईल. काही तर बोलले जाईल, असे त्यांना वाटत होते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. जिल्हा नियोजन बैठकीला माझ्याप्रमाणे विधान परिषद आमदारांना जयंत पाटील बोलवत नव्हते. इतका सत्तेचा माज चांगला नसतो”, असे गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केले. (tv9 मराठी)