मुंबई: ऐन सणासुदीच्या तोंडावर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज त्यांच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार आता रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो दरातील वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असून, सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे.
दरम्यान, वाढीच्या निर्णयानंतर रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी 5.40 टक्क्यांवर होता. तसेच, रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत घेण्यात आला