Type Here to Get Search Results !

राज्यात लम्पी स्कीनच्या आजाराचा प्रादुर्भाव; संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित !



नवी दिल्ली:  दिवसेंदिवस राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारामुळं गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित करण्यात आले आहे. 




गोजातीय प्रजातींच्या गुरांचा किंवा म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. बीड आणि अहमदनगर जिल्लह्यात सर्व मोठे जनावरांचे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे.  



दरम्यान, तसेच, राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना करत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केल्याने, लंम्पी  चर्मरोगाचे नियंत्रण करता येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies