Type Here to Get Search Results !

“.....तर वेदांता प्रकल्पाची चौकशी निवृत्ती न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल”!



मुंबई : सध्या वेदांताचे प्रकरणावरून विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.



उदय सामंत म्हणाले, “उद्योग खात्यात काय गोंधळ सुरू होता तो मी शोधून काढणार आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी वेदांता प्रकल्पाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. वेळ पडल्यास वेदांता प्रकल्पाची चौकशी निवृत्ती न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल याशिवाय, आठ महिने या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडी सरकारने बैठक का घेतली नाही? असा सवालही उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.



दरम्यान,  उद्योग मंत्र्यांनाच प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हते असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies