मुंबई: मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरु आहे. यावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, "दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, तसेच, याकूब मेमनची अंत्ययात्रा आणि अंत्यविधीसाठी तत्कालीन भाजप सरकारनं परवानगी कशी दिली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. स्वत:च्या चूकीचं खापर दुसऱ्याचा डोक्यावर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ती जागा खाजगी ट्रस्टची आहे. याकूब मेमनचा दफन विधी झाला तेव्हा भाजपचं सरकार होतं. त्यावेळी दहशतवाद्याचा दफन विधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कसाबप्रमाणे याकूब मेमनला दहशवाद्यासारखी वागणूक का नाही दिली. याकूबचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा प्रश विचारत आदित्य ठाकरेनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.