पुणे : केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांना मुंबईत येऊन महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं भाषण करावं लागतं. केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये धमक नाही का? असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला.
तसेच ते म्हणाले, “केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये करिष्मा नाही का, असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला. मागील निवडणुकीतही भाजपने अशीच घोषणा केली होती, असेही त्यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, दानवे गणपती दर्शनासाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.