Type Here to Get Search Results !

“....यामध्ये कुणीही असलं तरी खपवून घेतलं जाणार नाही”: देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य!



मुंबई : आज स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. 



फडणवीस म्हणाले, आपल्याला दोन वर्षांत बदल करून दाखवायचा आहे. चांगल्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. शहरीकरणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मिती होईल. नवनवीन तंत्रज्ञान समोर येईल. चांगल्या स्टार्टअपला काम देण्याचा विचार केला पाहिजे.



विकासाच्या मार्गात कुणालाही अडथळा आणू देणार नाही. त्यामुळं माफ करा. थोडं स्पष्ट बोलतो. टक्केवारीकरिता प्रकल्प अडकवून ठेवणे हे खपवून घेतलं जाणार नाही. यामध्ये कुणीही असलं तरी… लोकप्रतिनिधी असतील,तर मुख्यमंत्र्यांना सांगा. अधिकारी असतील, तर लोकप्रतिनिधींना सांगा. पण, हे सगळे धंदे यातले बंद झाले पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलं. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies