मुंबई - मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीसंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
यावेळी ते म्हणाले, “मनसेचा भाजप आघाडीला कुठलाही फायदा नाही. राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही, असे आठवले यांनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंना युतीत घेण्यास रामदास आठवलेंनी विरोधच दर्शवला आहे.
दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आज औरंगाबादेत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद जिल्हात अत्याचार झालेल्या दोन दलित व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट व माजी राज्यमंत्री अॅड. प्रितमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आठवले आज शहरात आले आहेत.