मुंबई - चेंबूर मधील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री दहाच्या आसपास एका व्यक्तीने पत्नी मुस्लिम रीती रिवाज पाळत नसल्यामुळे तिची हत्या केली आहे.
माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी मोहम्मद इकबाल शेख याच्याशी मृतक रूपाली हिने लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच आरोपी इकबाल कुटुंबासोबत राहत होता आणि रूपालीला मुस्लिम रिती रिवाज पाळण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळे या दोघांमध्ये कायम वाढ होत होते. यादरम्यान रूपालीला एक मुलगी ही झाली होती. रोजच्या भांडणामुळे तिने वेगळे राहणे सुरू केले. त्यानंतर आरोपी पती आणि पत्नीमध्ये रोज फोनवर भांडण सुरु होते. सोमवारी रात्री आरोपी पतीने पत्नी रूपालीला बोलवले तेव्हा तिने घटस्फोट देण्यासाठी सांगितले. तेव्हा या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले आणि या भांडणांमध्ये आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यात रूपालीचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.