मुंबई : बुधवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी वाशिमच्या खासदार भावना गवळींवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भावना गवळींनी प्रत्युत्तर दिले आहे.
भावना गवळी म्हणाल्या, “काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले, रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये असे म्हणत भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
दरम्यान, खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप झाले. यानंतर आता त्यांना क्लिन चीट दिली जात आहे. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा सवालही उद्धव यांनी टीका करताना उपस्थित केला होता.यावर भावना गवळींनी प्रत्युत्तर दिले.