आटपाडी: आज कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 सप्टेंबरचे दिनविशेष.
भारतीय स्वातंत्र्यसेनानी नेते दादाभाई नौरोजी यांचा जन्म.
1882 : थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
1937 : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
1941 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.
1952 : अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म.
1998 : गुगल स्थापना दिवस
गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध आणि आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वापर केला जाणाऱ्या Google ची स्थापना 4 सप्टेंबर 1998 रोजी लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी ते कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी होते .
1997 : पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, लेखक, नाटककार आणि थोर सामाजिक विचारवंत तसचं, धर्मयुग या लोकप्रिय हिंदी साप्ताहिक मासिकाचे माजी मुख्य संपादक धर्मवीर भारती यांचे निधन.