मुंबईः ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रात शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख आहे, अशी माहिती समोर आली आहे. 2007 साली संजय राऊत, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री यांच्या नावाचा उल्लेख आरोप पत्रात असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच, 2006 – 07 या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असे स्पष्टपणे ईडीने आरोप पत्रात नमूद केले आहे,अशी माहिती समोर येत आहे.
तसेच पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे प्रंट मॅन म्हणून काम करत होते. मात्र संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.(सौ.tv9 मराठी)