मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रीमंडळ बैठक आज पार पडली. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत शिवभोजन थाळी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि ही थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ही योजना बंद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला नियमित सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.