मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामागे भाजपच्या नेत्याचा हात असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, पोस्कोअंतर्गत कारवाई आणि तडीपारी असताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्यांचा भाऊ कुंदन माळी दहशत निर्माण करत आहेत, मात्र, पोलीस त्यांना पाठिशी घालत आहेत,असा आरोपही चव्हाण यांनी केला.