जालना: जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा या गावाच्या शिवारातील शेतात विजेच्या धक्क्याने सहा गायी मृत्यूमुखी पडल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुह्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. न्यायालयाने या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आंबा गावातील आरोपी शेतकरी लतीफ शेख मकदूम याने शेतामध्ये विजेच्या तारा लावून ठेवल्या होत्या. प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण व्हावं, यासाठी या तारा त्यानं लावल्याची माहिती मिळाली आहे. या तारांमधून लतीफने विद्युत प्रवाह सोडला होता. त्याचाच धक्का बसून सहा गायींचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी तातडीने मकदूम याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती.