मुंबईः पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचे नाव आले आहे, त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचे नाव असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे आणि अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, गुरु आशीष कंस्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचे कंत्राट देण्यात राज्याचे जाणते राजे शरद पवार यांचाही सहभाग होता, हे ईडीने पुराव्यानिशी चार्जशीटमध्ये दाखवून दिले, त्यामुळे राज्याचे गृहमंत्री यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.