मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता सुप्रीम कोर्टापासूनकेंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे.आता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावे अशी मोठी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. या मागणीमुळे राज्यातील शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढण्याची आहे. याच पार्श्वभूमीवर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चाललेला सर्व प्रकार लोक बघत आहेत. ज्या हिंदुत्वावर हे बोलत असतात त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह भाजपच्या मदतीने गोटवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे. बाळासाहेबांच्या मुलाला खुर्चीवरून खेचलं गेलं हे देखील लोक पहात आहेत. केद्रीय गृहमंत्री ज्या पद्धतीने शिवसेनेला आसमान दाखवायची भाषा करतात त्यावर कोणी चक्कार शब्द काढत नाही. यावरूनच गेलेले सर्व लोक शिवसेनेचे नसून ते भाजपचे झाले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय कठीण पेपर कसे सोडवायचे हे शिवसेनेला चांगलं माहित आहे. यापूर्वीही रणसंग्राम होता आता फक्त तो जरा जास्त आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह लोकांच्या मनात कोरलेलं आहे. जर ते गोठवलं तर त्याच रागातून जनता लोकशाही पद्धतीने उत्तर देईल असंही पेडणेकर म्हणाल्या.