संगमनेर : स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी तिर्थरूप भाऊसाहेब थोरात व हरीतक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव निमित्ताने संगमनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मथुरागिणी महोत्सव २०२२ चे उदघाटन काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, सौ दुर्गा सुधीर तांबे, सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते, युवा कीर्तनकार ह.भ.प.मुक्ता आणि उन्नती चाळक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
त्यावेळी त्या म्हणाल्या, “खोक्यांचा गोंधळ घालत बोक्यांनी अनाथ बालकांचा निधी पळवून लावला आणि पूर्वी मंजूर असलेली २५०० रुपये ही रक्कम देखील निधी स्वरूपात देण्याबाबतीतच्या निर्णयावर या निर्दयी सरकारने रोख आणली, असा आरोप करीत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचे काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.