नवी दिल्ली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना आज २८ सप्टेंबरला तिरुवनंतपूरम येथे होणार आहे. मात्र, सामना सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
दिग्गज खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. तर अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने याआधीच संघाच्या बाहेर आहे. तसेच, हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंच्या जागेवर उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमदचा स्क्वॉडमध्ये समावेश केला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर दिली आहे.