अहमदनगर :श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून केल्याची कबुली अटकेतील आरोपीने दिली आहे. दीपक बर्डे या तरुणाचे मुस्लिम मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, या गोष्टीला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, दीपक बर्डे हा अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील एक तरुण होता. तो गेल्या 12 ते 13 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता होण्यामागे दीपक बर्डे यांच्या वडिलांनी मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. 31 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सर्व आरोपींना अटकही करण्यात आली होती.
दरम्यान, दीपक बर्डे याचा मृतदेह गोदावरी नदीच्या आरोपींनी फेकला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानुसार आता नदी पात्रात मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना अगोदर सात दिवस पोलीस कोठडी मिळाली. नंतर 13 तारखेपर्यंत पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपींनी दीपकचा खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र अद्याप हत्येचे कारण नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.