मुंबई: महाविकास आघाडी काळात उद्योग खात्यामध्ये काय उद्योग झाले आहेत, याचा शोध आता शिंदे सरकार घेणार आहे. वेदांताबाबतही मविआ सरकारच्या काळात डील झाली असल्याचा आरोप उद्योगमंत्री सामंत यांनी केला आहे. याबाबतीत नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्याकडे पुरावे असून त्यांच्याकडून पुरावे मिळताच संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेला हे राज्याच्या दृष्टीने हानीकारक आहेच, पण आगामी काळात त्यापेक्षा मोठे प्रोजेक्ट राज्यात कसे आणता येतील याबाबत रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे उद्योगाबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.