मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगा भरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. शिवाय विशेष संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेटमध्ये पार पडणार आहे असून रेल्वे व केंद्रीय परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मेगाभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.