मुंबई: आज संदीप देशपांडे यांनी प्रसारामाध्यामाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ”वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे. एखादा प्रकल्प गुजरातला जाणे हे योग्य नव्हे. गुजरात असे काय सोई सुविधा देत आहे याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.