Type Here to Get Search Results !

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया....!



मुंबई: सुप्रीम कोर्टातने शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाचे याबाबतच्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



आदित्य ठाकरे म्हणाले, 'आपली देशातील आणि जगातील जनता बघत आहे. सुप्रीम कोर्टाने कोणाला दिलासा नाही तर युक्तिवादाचे कोर्ट बदललेलं आहे. सुप्रीम कोर्टात होतं, ते आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तिथे युक्तिवाद सुरू राहील. आम्ही निवडणुकासाठी सामोरे जाऊ. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. विजय सत्याचा होईल, त्यामुळे विजय शिवसेनेचा होईल. गद्दाराच्या गटामध्ये जेव्हा वाटते की शिवसेनेला धक्का बसतो, तेव्हा जल्लोष केला जातो. न्यायप्रकियेवर आमचा विश्वास राहणार आहे. आमचा लढा लोकशाही आणि संविधानासाठी महत्वाचा ठरेल. आमचा विश्वास सत्य, न्यायदेवेतेवर आहे. आम्ही त्यासाठी लढत राहू', असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies