Type Here to Get Search Results !

“काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकतात”



नवी दिल्ली: “काही सांप्रदायिक तत्व समाजात तेढ निर्माण करत आहेत. काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकले जात आहे असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्रता बंधुत्व याचं रक्षण केलं पाहिजे असेही पवार म्हणाले आहेत.


तसेच ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे महागाई वाढलीय. ४१० रुपयांचा गॅस १ हजार रुपयांचा झाला. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies