मुंबई :शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. नियमानुसार कायद्याच्या आधारे निर्णय घेतले जातात. आम्ही कायद्याच्या चौकटीबाहेर जात कोणतीही कृती केलेली नाही. शिवसेना-भाजप युतीचे सरकार घटनेच्या कायद्याच्या आधारावर आहे. सर्वांना अपेक्षित होता असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
आजचा निर्णय पहिला टप्पा आहे. पुढेही जे काही होईल ते नियमाप्रमाणे होईल. नियमाप्रमाणे जे निर्णय होतील त्यांचं आम्ही स्वागत करु. केंद्रीय निवडणूक आता योग्यरित्य निर्णय घेईल. आताच त्याच्यावर काही भाष्य करणे योग्य ठरणार नाह, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले.