मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले.
तसेच, विशेष विमानाने नामिबियातून हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. कुनो नॅशनल या अभयारण्यात चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे. तसेच या चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, हे चित्ते काही दिवस अभारण्याच्या विशिष्ट परिसरात ठेवण्यात येणार आहेत. त्यांना या जंगलातील हवा आणि पानी मानवतं की नाही याचा काही दिवस अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे.