पालघर : पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा अधिक्षकांनी दिली आहे.
माहितीनुसार, मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात इतर दोन जणांचाही मृत्यू झाला. सायरस मिस्त्री २०१९ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.