नवी दिल्ली: काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाकडेही दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्या राजवटीत त्यांना भारतरत्न देण्यात आला नाही, याशिवाय, "काँग्रेसला बाहेर काढल्यानंतरच त्यांना भारतरत्न देण्यात आला" असे भाष्य अमित शाह यांनी केले.
तसेच, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस आता देशातून गायब होत असल्याचा टोला लगावला आहे. तसेच भाजपाच राज्याचं भविष्य असल्याचं म्हटलं आहे. भाजपा पक्षच दक्षिणेकडील राज्यांचे भविष्य आहे आणि आता जग कम्युनिस्ट पक्षांपासून मुक्त होत आहे असेही सांगितले.