Type Here to Get Search Results !

...म्हणून भाजपनं देशाची माफी मागावी: काँग्रेसकडून मोठे प्रत्युत्तर!



मुंबई: मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी याकूबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीवर जे काही कोरोना काळात सौंदर्यीकरण झाले. उद्धव ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी देखील भाजपनं केली आहे. याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 



लोंढे म्हणाले की, , माझं काही लोकांसोबत बोलणं झालं. ज्यावेळी बॉडी दफन केली जाते त्याच्या तीन वर्षांनंतर दफन केलेल्या ठिकाणी वखर करण्यात येतं आणि ती कबर खोदली जाते. मात्र असं झालं नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे झालं आहे याचे उत्तर भाजपने द्यावे , असे लोंढे म्हणाले. 



तसेच ते म्हणाले कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबियांना देत नाहीत,  भाजपने तो दिला. आमच्या काळात अफजल गुरू आणि कसाब यांचा मृतदेह अज्ञातस्थळी दफन केला होता. मात्र भाजपने 2015 साली मेमनची बॉडी दिली आणि त्यावर दफनविधी झाल्याचंही पाहायला मिळालं, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies