Type Here to Get Search Results !

“दंगलीच घडवायच्या तर आधी आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये.....”: ‘यांची’ उद्धव ठाकरेंवर टीका!



मुंबई :रस्त्यावर उतरायचे शिवसैनिकांनी आणि यांच्या लेकरांनी एकतर घरात किंवा हॉटेलमध्ये पार्टी करीत बसायचे. आतापर्यंत हेच सुरु होते. खोटे आरोप करुन दंगलीच घडवून आणायच्या असतील तर आधी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या दगड द्या अन् रस्त्यावर उतरवा असा सल्लाच पावसकर यांनी पक्ष प्रमुखांना दिला आहे. गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हीच त्यांची परंपरा असल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे.



दरम्यान, प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर आता राजकीय मतभेद अधिक टोकाला गेले आहेत. यातच शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी थेट पोलिस स्टेशनसमोरच गोळीबार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खा.अरविंद सावंत यांनी केली होती. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies