मुंबई : कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुवरुन राळ उडाली आहे. आतापर्यंत या निवडणुकीच्या रिंगणात राहुल गांधी आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावे चर्चेत होती. मात्र, गांधी कुटुंबातील सदस्य निवडणुकच लढविणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
त्यामुळे आता राहुल गांधी यांचे नाव नाहीतर शशी थरुर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे ते निवडणुकीत सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या 25 वर्षापासून अध्यक्षपद हे गांधी कुटुंबियांकडेच होते. त्यामुळे आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.