Type Here to Get Search Results !

“राज्य सरकार अस्थिर असल्याचं प्रशासनालाही समजलं आहे”!



नाशिक: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 



“राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय 40 आमदारांना कधीही बरखास्त करू शकतात. सर्व 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे. हे 40 जण किती त्रास देत असतील. पण माझी सहानुभूती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, तसेच, भाजपच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आल्याने भाजपचे 106 आमदारही नाराज आहेत. सरकार अस्थिर असल्याचं प्रशासनालाही समजून चुकलं आहे. त्यामुळे अधिकारीही ऐकत नाहीत, असे वक्तव्य  जयंत पाटील  यांनी केले.


दरम्यान, जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies