अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये तारखेड येथे मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेलेले तिन मच्छिमार पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी सायंकाळपर्यंत दोघांचे मृतदेह सापडले तर एका तरुणाचा शोध सुरू आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, तिवसा तालुक्यातील तारखेड येथील तिघेही युवक मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले असता त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मच्छिमार बुडाल्याची माहिती मिळताच जिल्हा शोध व बचाव पथकाने रेस्क्यू करून तीन तासातचं दोघांचे मृतदेह काही अंतरावर शोधून काढले. पंकज मेश्राम वय १९ वर्ष व अनिकेत मेश्राम वय १८ वर्ष या दोघांचे मृतदेह सापडले असून, बाळू नांदने वय २६ वर्ष या मच्छिमाराचा शोध नदीपात्रात सुरू आहे.