सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील नांद्रे या ठिकाणी भरधाव जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना मध्यरात्रीच्या सुमारेस ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोंखडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरुण ठार झाले. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.