मुंबई :अनिल देशमुख यांच्या गेल्या सात महिन्यापासून जामीन अर्जावर सुनावणी झाली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी तर झाली पण निर्णय काय तो अद्यापही समजू शकलेला नाही. उच्च न्यायालयात जामीन अर्जावर प्रभावीपणे सुनावणी होत नसल्याची खंत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.
दरम्यान, बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. ही सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निर्णय हा राखून ठेवलेला आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे जेलमध्ये की जेलबाहेर हा निकाल अद्याप समोर आलेला नाही.